गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

Mahalaxmi Mandir, Kolhapur

                                महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

  

कोल्हापूरची अंबाबाई करवीर निवासीनी खºया अर्थाने महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. येथील महालक्ष्मी मंदिर पुरातन उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी 1 आहे. तर महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपिठांपैकी 1 पीठ गणले जाते. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या काळात इसवी सन 600 ते 700 च्या काळात बांधले असण्याची शक्यता आहे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यावरुन अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. मुस्लिमांनी देवळ्याचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती अनेक वर्षे पुजा-याने लवपून ठेवली होती. पूढे संभाजी महाराजांच्या काळात इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक यामुळेच पडला असावा.

अशी आहे मंदिराची वास्तू

हे देवालय आकराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी किंवा आयताकृती दगडात करण्यात आलेली आहे. मंदिर पश्चिमभिंमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरुच्या खांबाचा व इप्सिदार कमानी असलेला सभमंडप प्रवेश केल्यावर दिसतो. मंदिराचे चार महत्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा असून उत्तरेकडे असलेली मोठी घंटा दिवसातून पाच वेळा वाजविली जाते. तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाºया सभामंडपास महानाट मंडप असे नाव देण्यात आले आहे. देवळाच्या भिंतीवर नर्तिका, वाद्ये वाजविणाºया स्त्रिया, मृदंग, टाळकरी, टाळकरी, वीणावादी, अप्सरा व योद्धे कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन, विना चुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत.


शिलालेख
मंदिराच्या चार वेगवेगळ्या भागात शिलालेख कोरलेले आहेत. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरिश्वराच्या देवळाच्या भिंतीवर शके 1940 मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके 1158 चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोट्या देवळातील एका खांबावर आहे. तर चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करतांना लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा